Friday, 26 September 2014

हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे

हे लिहताना हि दुख: होतंय कारण छत्रपतींच्या नावाने आणि छत्रपतींच्या पोस्ट करणाऱ्या महाशयांना छत्रपतींचा इतिहास माहित नाही ..
कारण आज हा महाराष्ट्र कुणाचा आहे या वरून ज्या पोस्ट केल्या जातात त्या वाचून देखील मला आनंद नाही तर दुख: होतंय कारण आपण समजू शकलो नाही छत्रपतींना तुम्ही समजू शकला नाही छत्रपतींना .. तुम्ही कसे समजू शकणार रे त्यांना त्यांच्या चार पोस्ट इकडून तिकडून कॉपी करून टाकल्या कि झालो आम्ही शिवभक्त हे डोक्यात घेणार्यांनी पहिला छत्रपतींचा इतिहास वाचला पाहिजे त्यांच्या इतिहासाचे धडे घेतले पाहिजेत .. आणि मगच सांगावे कि हा महाराष्ट्र कुणाचा आहे आणि कसा त्या छत्रपतींनी घडवला आहे..
आज हि मी हेच सांगीन
जे कायम सांगत आलो
आहे
हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे
आणि त्यांचाच असेल
या महाराष्ट्रा साठी
शिवरायांनी दिस रात केली
आहे
हा महाराष्ट्रा त्यांनीच घडवला आणि
वाढवला आहे .

जय जिजाऊ
जय शिवराय ..
लेखक-कवी
अजयसिंह घाटगे सरकार ..

No comments:

Post a Comment